कविसंमेलनात विषमतेवर प्रहार, विटा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : नवोदित कवींच्या ज्वलंत प्रश्नावर कविता
विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते? विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते? मूल्यास गाढणारे ते लोक कोण होते? असे विविध सवाल करीत विटा (जि. सांगली) येथील कविसंमेलनात प्रसिध्द गजलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी, कोरेगाव-भीमा प्रकरणामुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेवर भाष्य करीत प्रहार केला. विटा येथे रविवारी भारतमाता ज्ञानपीठ साहित्य सेवा मंडळ व मुक्तांगण वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या ३६ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सांगोलेकर बोलत होते. कविसंमेलनाचे सरस्वतीपूजन कविता चव्हाण व बाळकृष्ण चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. मोहनराव कदम, माधुरी कदम, सुधीर कुलकर्णी, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर उपस्थित होते. कविसंमेल